Type Here to Get Search Results !

वर्धा पोलिसांकडून हरवलेले मोबाईल फोन परत करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला






महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमीत्य दि. ०५.०१.२०२६ रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथील आशिर्वाद हॉल येथ े हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे केवळ संवादाच े साधन नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईलमध्य े वैयक्तिक माहिती, बंकिंग तपशील, शासकीय कागदपत्रे, फोटो, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने मोबाईल हरवल्यास नागरिकांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन वर्धा पोलीस दलान े हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रम राबविला.


या कार्यक्रमात एकूण ९६ हरविलेले मोबाईल फोन अंदाजे कि. ९ लाख ६० हजार रु. चे शोधून त्यांच े मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. सदर मोबाईल फोन मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या शुभहस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले.


सदरची उल्लेखनीय कामगीरीत सहा. पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, मिना कौरती, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जिभे व स्मिता महाजन सर्व नेमणुक सायबर


सेल, वर्धा यांचा विशेष सहभाग राहिला.                                                                                                                                  हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️ ✍️


Post a Comment

0 Comments